सातारा : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले तरी त्यांना अॅडमिशन मिळत नाही. उलट कमी गुण मिळालेल्यांना अॅडमिशन मिळतं. प्रत्येक विद्यार्थ्याला बुद्धी दिलेली आहे. त्यामुळे मराठा आरक्षण देता येत नसेल, तर सगळेच आरक्षण रद्द करा आणि मेरिटवर निवड करा, हे मी अनेकदा सांगितलं आहे, असं वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे.
मराठा आरक्षण प्रश्नावर पुण्यात 3 ऑक्टोबर रोजी विचारमंथन बैठक होणार आहे. या बैठकीस निमंत्रण देण्यासाठी आमदार विनायक मेटे यांच्यासह इतर नेत्यांनी साताऱ्यातील जलमंदिर पॅलेसमध्ये उदयनराजे यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी आरक्षण प्रश्नावर चर्चा केली.
मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर समाजात प्रचंड संताप आहे. प्रत्येकाला ज्या पद्धतीने आरक्षण मिळालं. त्याच पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं. मराठा समाजाची आर्थिक स्थिती बिकट आहे. विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळूनसुद्धा अॅडमिशन मिळत नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर सगळेच आरक्षण रद्द करा. मेरिटवर सर्वांची निवड करा, असं उदयनराजे म्हणाले.
महत्वाच्या बताया
- कोरोना काळात सरकारने जनतेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे- अण्णा हजारे
- स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर भाजपचेच:- महापौर बाबासाहेब वाकळे
- शिवसेना एकटी सरकार चालवत नाही… राष्ट्रवादीच्या नेत्याचे खडेबोल
- ‘सुशांतसिंह मुद्द्यामागे केवळ निवडणूक’
- फणडवीस आणि मी काही शत्रू नाही; भेटीनंतर संजय राऊत यांचे मोठं विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

