नागपूर : संपूर्ण जगात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसने भारतात शिरकाव केल्यापासून अनेक लोक याचे शिकार होत आहेत. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 400 पार गेला आहे.
याच पार्श्वभूमीवर नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे हे कठोर निर्णय घेतले आहेत. व नागपूरकरांना आवाहन पाळण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी बाबत tv9मराठी’ वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. ते म्हणाले की, ‘कोरोनाला रोखण्यासाठी जे निर्णय घेण्याची गरज आहे, ते घेतले जात आहेत. त्यावर 100 काम सुरु आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली.
‘माझी विनंती आहे, आपल्याला हव्या असलेल्या अत्यावश्यक गोष्टी या पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत, तास उपलब्ध आहेत, त्यामुळे कृपया गर्दी करु नका, सोशल डिस्टंसिंग पाळा. आपण या कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न करु,’ असं मुंढे यांनी यावेळी बोलताना म्हणाले.
दरम्यान, सोशल डिस्टंसिंग पाळा, आवश्यक असल्यास घरातील एकाच व्यक्तीने बाहेर पडावं. सोशल डिस्टंसिंग पाळून भाजी किंवा इतर वस्तू खरेदी कराव्या. 14 एप्रिलपर्यंत जर आपण हे तंतोतंत पाळलं, तर करोनावर आपण मात करू शकतो, असं देखील तुकाराम मुंडे म्हणाले.


