औरंगाबाद : सततच्या लॉकडाऊनमुळे व्यापा-यांची आर्थिक कोंडी झाली असल्याने व्यापा-यांना विजबिल माफी देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हा व्यापारी महासंघातर्फे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना देण्यात आले आहे.
या निवेदनात पुढे म्हंटले आहे की, व्यापा-यांनी सातत्याने आर्थिक पॅकेज मिळावे यासाठी प्रयत्न केले. परंतु सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे वीज बिलातील शासनाकडे जमा होणारी रक्कम माफ करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
वीजबिलातील स्थिर आकार घरगुतीसाठी १०० रुपये व वाणिज्य ४०३ रूपये औद्योगिक ४५४ रूपये प्रति महिना इलेक्ट्रिसिटी ड्युटीचे सर्व पैसे शासन दरबारी जमा होतात ते माफ करण्यात यावे उदा.घरगुती १६ टक्के वाणिज्य २१ टक्के औद्योगिक ९.२ टक्के एकुण विज वापर आकारावी. वीज बिलातील या गोष्टी पूर्णपणे पुढील सहा महिन्यासाठी माफ करण्यात याव्या, असे निवेदनात म्हंटले आहे. यावेळी जिल्हा महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, सचिव लक्ष्मीनारायण राठी, तनसुख झांबड, सरदार हरी सिंग, गुलाम हक्कानी, जयंत देवळानकर व अन्य व्यापारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रीय राजकारणात कॉंग्रेससाठी शिवसेनेसोबतची आघाडी ठरतेय अडचणीचा मुद्दा ?
- ‘हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा!’, राऊत यांचे चंद्रकांत पाटलांना आव्हान
- रंगत वाढणार! श्रीलंकाविरोधात कर्णधार धवनसोबत ‘हा’ खेळाडू सलामीला उतरण्याची शक्यता
- बाधितांच्या संख्येत घट तरी जालन्यात मृत्यू सत्र सुरुच!
- ‘..म्हणून मोदींनी मार्च महिन्यातच भारत कोरोनामुक्त झाल्याचे सांगितले’, काँग्रेसचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

