लखनौ : भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणारा क्रिकेटचा सामना नेहमीच चर्चेचा विषय असतो. मात्र, यंदाच्या वर्ल्डकपमध्ये झालेल्या सामन्यामध्ये पाकिस्ताननं भारताचा पराभव केल्यामुळे या चर्चेला वेगळं वळण मिळालं आहे. उत्तर प्रदेशमध्ये काही लोकांनी पाकिस्तानचा विजय साजरा केल्यामुळे त्यावरून वातावरण चांगलंच पेटलं असून आता त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालणार असल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केलं आहे.
पाकिस्तानच्या विजयाचा जल्लोष साजरा करत फटाके फोडणाऱ्यांविरोधात ‘देशद्रोहा’ चा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणात जवळपास सहा जणांवर आधीच गुन्हे दाखल केले आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर या आरोपींवर आता ‘देशद्रोहा’चा गुन्हाही दाखल केला जाणार आहे.
नुकत्याच झालेल्या भारत-पाकिस्तान टी-२० मॅचमध्ये पाकिस्तानकडून भारताचा पराभव झाल्यानंतर काश्मिर, पंजाब, उत्तर प्रदेशसहीत काही राज्यांत फटाके फोडून घोषणाबाजी करण्यात आल्याचं समोर आलं होतं. ही घटना राज्य सरकारनं गंभीरतेनं हाताळण्याचा निर्णय घेतलाय. अशा लोकांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येत असल्याचं उत्तर प्रदेशचे डीजीपी मुकुल गोयल यांनी म्हटलंय. देशाविरुद्ध कोणतीही घटना घडली तर त्याबाबत ताबडतोब देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जावा असे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदी सरकारकडून साखर कारखान्यांना दिलासा, प्राप्तिकरातून कारखान्यांची सुटका
- शेतकऱ्यांची कोंडी करण्याचा आघाडी सरकारचा कट उघड झाला; ठाकरे सरकारवर भाजपची जोरदार टीका
- मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंदरस्ते योजना; राज्यात २ लाख किलोमीटरचे शेत, पाणंदरस्ते बांधणार
- महाराष्ट्रातील ‘या’ नदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाला केंद्रीय कॅबिनेटच्या वित्त समितीची मंजुरी
- सर्वसामान्यांची लालपरी थांबली, शेकडो प्रवासी औरंगाबाद स्थानकावर खोळंबले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

