🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : जामिया विद्यापिठात झालेल्या हिंसाचारचा कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी निषेध केला आहे. या हिंसाचाराच्य निषेधार्थ प्रियांका गांधी यांनी दिल्लीतील इंडिया गेट या ठीकाणी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून देशभरात विपक्ष, नागरिक आणि विध्यार्थीनकडून आंदोलन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर जामिया विद्यापीठात आंदोलना दरम्यान विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून हिंसाचार करण्यात आला.
इंडिया गेट या ठीकाणी जामिया विद्यापीठतील हिंसाचाराचा निषेध म्हणून ठिय्या आंदोलनात प्रियांका असे म्हणाल्या की, पोलीस विद्यापीठात घुसखोरी करत असून विद्यार्थ्यांना मारहाण करत आहेत. सरकारने पुढे येऊन लोकांचं म्हणणं ऐकून घेणं अपेक्षित असताना भाजपा सरकार मात्र दिल्ली, उत्तर प्रदेश आणि ईशान्येकडील विद्यार्थी आणि पत्रकारांचा आवाज दाबत आहे. हे भ्याड सरकार आहे,”हा देश गुंडांच्या मालकीचा नाही. अशा शब्दात त्यांनी आपल निषेध व्यक्त केला आहे.
नागरिकत्व सुधारणा विधेयक हे संविधान विरोधी आहे. हे आम्हाला मान्य नाही. असे म्हणून जामिया विद्यापीठातील विद्यार्थी आंदोलन करत असताना पोलीस विद्यापीठात शिरले आणि हिंसाचार केल्याचा व्हिडीओ व्हाईरल झाला होता. याच घटनेचे पडसाद संपूर्ण देशात वेगवेगळ्या ठिकाणी दिसत आहेत. वेगवेगळे पक्ष, विद्यापीठ आणि संस्थांकडून आंदोलन केले जात आहे. तर परवानगी शिवाय पोलीस विद्यापीठात शिरले.पोलिसांकडून करण्यात आलेल्या हिंसाचारात विद्यापीठाचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार. असे जामिया विद्यापीठातील कुलगुरुनी म्हंटले आहे.
महत्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1206553852700311552?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1206550805597192200?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
