मुंबई : ‘मी ओबीसीचे नेतृत्व करणारा सामान्य कार्यकर्ता आहे. माझ आयुष्य उध्वस्त करण्याचा हा प्रयत्न आहे’, असा आरोप संजय राठोड यांनी केला आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आरोप झाल्यानंतर वनमंत्री संजय राठोड जनतेसमोर कधी येतात याची प्रतीक्षा सर्वांनाच लागली होती. मात्र, आज प्रतीक्षा संपली आहे. दोन आठवड्यांहून अधिक काळानंतर संजय राठोड हे माध्यमांसमोर आले असून यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील सर्व आरोप धुडकावले आहेत.
दरम्यान, या सर्व प्रकरणावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केले आहे. तसेच दोन-चार वर्षांनी संजय राठोड यांच्यावर कारवाई होणारच’, असे संकेतही दिलेत.
‘राठोड यांना कितीही क्लीन चिट दिली. आज त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर दोन-चार वर्षांनी त्यांच्यावर पूजा चव्हाण प्रकरणात कारवाई होणारच ना. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरण कधीही राठोड यांच्या मानगुटीवर बसू शकतं’, असे स्पष्ट संकेतच मुनगंटीवार यांनी दिले आहेत. मुनगंटीवार यांच्या अशा विधानामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- कर्नाटक सरकारचा आडमुठेपणा वाढला; महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर एसटी बसेस अडवल्या !
- बिग बॉसमधील ‘या’ अभिनेत्रीचे निर्मात्यावर गंभीर आरोप
- ‘शिवजयंतीला नियम, पोहरादेवीला गर्दी; हेच का समसमान वाटप?’
- ‘मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला राठोड सर्मथकांचा हरताळ, आता ठाकरी बाणा दाखवून कारवाई करावी’
- ‘शिवजयंतीला शिवनेरीवर १४४ कलम लावणाऱ्या महाभकास आघाडीला आज कोरोनाची भिती वाटली नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

