Share

प्रश्न विचारला की माध्यमांवर हल्ले ! अशाने पूजा चव्हाणला न्याय मिळणार का ? : फडणवीस

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड हे पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर नॉट रिचेबल होते. मात्र, आज ते समोर आले. यावेळी पोहरादेवी याठिकाणी संजय राठोड समर्थकांनी तुफान गर्दी केली होती. त्यामुळे कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याचे दिसून आले होते. बेकाबू गर्दीवर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला अशी परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळाली.पोलिसांचे आदेश झुगारत ५० जणांची परवानगी असताना हजारो समर्थकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. शिवसेनेचे कार्यकर्ते नेते हेच या गर्दीत मोठ्या प्रमाणावर होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाला शिवसेनेच्याच मंत्र्याने केराची टोपली दाखवल्याची टीका विरोधकांकडून केली जात होती. याच पार्श्वभूमीव विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील सरकार वर टीका केलेली आहे. त्यांनी ट्वीत करून सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले कि, ‘मा. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्याकडून असा प्रतिसाद! पोलिस आणि मिडियांच्या वाहनांची तोडफोड! प्रश्न विचारला की माध्यमांवर हल्ले! अशाने पूजा चव्हाणला न्याय मिळणार का ?’ असा संतप्त सवाल यावेळी त्यांनी विचारला आहे.

मात्र, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नियम मोडणाऱ्यांना फटकारलं आहे. ‘कोव्हीड संदर्भातील नियम जे सर्वांसाठी सारखेच आहेत. त्यामुळे पोहरादेवीतील उपस्थितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी,’ असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!