🕒 1 min read
औरंगाबाद : शहराच्या नामांतराचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच शहरात बॅनरवॉर भडकल्याचेही पाहायला मिळाले होते. परंतु आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाही त्याची झळ पोहोचत असल्याचे दिसून येत आहे.
वैजापूर तालुक्यात बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या बसवर संभाजीनगर फलक लागलेला होता. अज्ञात तरुणांनी दगडफेक करून बसची काच फोडल्याची घटना घडली. यामुळे पुन्हा एकदा औरंगाबाद नामांतराचा मुद्द्यावरून राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत.
मागच्या अनेक दिवसांपासून औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर असे करण्यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेनेचीही तीच भूमिका आहे. परंतु राज्यातील सत्तेतील सहकारी असलेल्या काँग्रेसचा याला ठाम विरोध आहे. यामुळे शिवसेना व काँग्रेस नेत्यांमध्ये तुंबळ वाक्युद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे, भाजपने शिवसेनेला याच मुद्द्यावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. आता वैजापुरातील बस फोडल्याच्या घटनेने हे वातावरण जास्तच गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- नेत्यांनी पहिल्यांदा आपली गल्ली सांभाळायला पाहिजे नंतर महाराष्ट्र; मुश्रीफांचा पाटलांना टोला
- असमानतेचा सामना करून अखेर तृतीयपंथी अंजली पाटील यांनी संघर्षाचा शेवट गोड केला !
- ‘कोकणात भगवा फडकला…पण तो भाजपाचा!’
- बहिष्कार, भाऊबंदकी आणि धुरळा; अकलूजची चर्चाच चर्चा
- निकाल लागले, आता सरपंचपदाची आरक्षण सोडत कधी? हसन मुश्रीफ म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

