Share

‘भाजप ‘तेव्हा’ही प्रामाणिक नव्हती आणि आताही नाही ; दुटप्पी भाजपला ओळखलेली जनता आमच्याबरोबर’

Published On: 

मुंबई : मुंबईतील सामान्य नोकरदार, कष्टकऱ्यांना उपनगरी प्रवासाची परवानगी न देणाऱ्या ठाकरे सरकारला धडा शिकविण्यासाठी सामान्य मुंबईकर २ ऑगस्ट पासून सविनय नियमभंग करीत लोकल प्रवास सुरु करतील असा इशारा भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिला होता. परंतु काही कारणास्तव भाजपने हे आंदोलन आज केले नाही. परंतु आता आंदोलन न केल्याने कॉंग्रेस नेते व प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे.

ब्रिटिशांवरुद्ध केलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनातून भाजपने पळ काढला होता. भाजप तेव्हाही प्रामाणिक नव्हता आणि आताही नाही अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे. भाजपचा दुटप्पीपणा ओळखून असलेली जनता आज भाजपसोबत नसून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत आहे. भाजप जनतेच्या जीवावर आंदोलन करणार होते भाजपमध्ये एकट्याने आंदोलन करण्याची क्षमता नाही असा घणाघातही सचिन सावंत यांनी भाजपवर केला आहे.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपच्या दुटप्पीपणावर भाष्य करत निशाणा साधला आहे. सचिन सावंत यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, हास्यास्पद तर आहेच परंतू अश्चर्यकारक निश्चित नाही. याचे कारण असे की सविनय नियमभंग ज्यावेळेला या देशामध्ये स्वतंत्रतापुर्व कालावधीमध्ये स्वातंत्र्यासाठी सविनय कायदेभंग आंदोलन होत होते त्यावेळेला यांनी पळ काढला होता. त्यामुळे भाजपकडे अनुभव नाही. ती क्षमता नाही. धैर्य नाही, त्या संदर्भातील साहस नाही आहे. ब्रिटिशांबरोबर त्या ठिकाणी जेव्हा आंदोलन करत होते तेव्हा पळ काढणारे ही लोक आता ते करु शकत नाहीत. असे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!