🕒 1 min read
मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यादरम्यान भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करण्यात आली. आयपीएल स्पर्धा ही इतिहासात पहिल्यादांच अर्ध्यातच स्थगित करण्यात आल्याने उर्वरीत स्पर्धा कधी आणि कुठे होणार असे प्रश्न विचारले जाऊ लागले.
भारतीय आणि इतर आंतरराष्ट्रीय संघाचे आगामी वेळापत्रक पाहता आयपीएल २०२१ स्पर्धेचे उर्वरीत सामने हे संप्टेंबर महिन्यात आयोजीत करण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. मात्र यासाठी बीसीसीआयने याकाळात पुर्वनियोजीत दक्षिण अफ्रिका संघासोबतची टी-२० मालिका रद्द करण्याचा विचार करु शकते. आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने आयपीएल स्पर्धेपेक्षा चांगली तयारी होऊ शकत नाही असे बीसीसीआयचे मत आहे. त्यामुळे, दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध होणारी टी -२० मालिका रद्द करण्यात येण्याची शक्यता आहे.
येत्या २ जुन रोजी भारतीय पुरुष आणि महिला दोन्ही क्रिकेट संघ २ जुन रोजी एकाच विमानातुन इंग्लंडला रवाना होतील. या दौऱ्यात भारतीय संघाला १८ ते २२ जून दरम्यान न्युझीलंड विरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. यानंतर ऑगस्ट- सप्टेंबर मध्ये इंग्लंड विरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अभिनेता सलमान खानने केआरकेच्या विरोधात कोर्टात केला मानहानीचा दावा
- मनोज वाजपेयी यांनी ‘द फॅमिली मॅन २’ वादासंदर्भात जारी केले निवेदन; पोस्ट शेअर करत दिले स्पष्टीकरण
- ‘हेमा मालिनी एक महान कलाकार आहे’; सावत्र नातवाने केले कौतुक
- होम आयसोलेशनवर बंदी घालण्याचा निर्णय अव्यवहार्य; पुण्याच्या महापौरांनी व्यक्त केली नाराजी
- ग्रामीण भागातील कोरोनाविरुद्धच्या लढ्याला मिळणार बळ,राज्य सरकारने केला ‘हा’ आदेश जारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
