मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशात सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटण्याहून मुंबईत आलेल्या आयपीएस अधिकाऱ्याला रविवारी रात्री मुंबई महापालिकेने क्वारंटाइन केलं. त्यावरून सोमवार सकाळपासून बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या प्रकरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात चौकशी करुन बिहार पोलीस फक्त कर्तव्य बजावत आहेत. यात कोणताही राजकीय हेतु नाही”, अशा शब्दात त्यांनी आपले मत मांडले. त्याचसोबत भाजपा नेते राम कदम यांनीदेखील या प्रकरणी संबंधित तपास यंत्रणेवर टीका केली. त्यातच आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनीही महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
“सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास ज्या प्रकारे सुरू आहे, त्यावरून मला असं वाटतं की मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही”, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे. या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी #JusticeforSushantSingRajput आणि #JusticeForDishaSalian हे दोन हॅशटॅगही ट्विट केले आहे.
The manner in which #SushantSinghRajputDeathCase is being handled – I feel #Mumbai has lost humanity & is no more safe to live – for innocent, self respecting citizens #JusticeforSushantSingRajput #JusticeForDishaSalian
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) August 3, 2020
अमृता फडणवीस यांच्या या ट्विट नंतर महाराष्ट्रात कमालीचे राजकारण तापलं असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या वादात उडी घेतली आहे. ‘आपली मुंबई सुरक्षित आहे ही मुंबई पोलीस तुम्ही बजावत असलेल्या कर्तव्यामुळेच… तुमच्या या मानवी मूल्ये जपणाऱ्या सेवाभावास सॅल्यूट’.. अस लिहित सुप्रिया सुळे यांनी पावसात उभा असणाऱ्या पोलिसाचा फोटो ट्विट केला आहे. त्यामुळे आ वाद अजून पेटणार आहे.
आपली मुंबई सुरक्षित आहे ही @MumbaiPolice तुम्ही बजावत असलेल्या कर्तव्यामुळेच…तुमच्या या मानवी मूल्ये जपणाऱ्या सेवाभावास सॅल्यूट…
Salute???????? pic.twitter.com/5LW0b0G9Gd
— Supriya Sule (@supriya_sule) August 6, 2020
दरम्यान, अमृता फडणवीस यांच्या ट्विटला युवसेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. ‘मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय ह्याच मुंबई पोलिसांची सेक्युरिटी कव्हर घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता?? सोडून द्या की सेक्युरिटी कव्हर भरोसा नसेल तर’ ! अस ट्विट करत वरुण सरदेसाई यांनी अमृता फडणवीस यांच्यावर शरसंधान साधलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

