Share

‘जो किसान की बात करेगा, वही देश पे राज करेगा’

Published On: 

मुंबई : कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात आता महाराष्ट्राचे शेतकरीही सामिल होत आहेत. राज्याच्या २१ जिल्ह्यांचे शेतकरी नाशिकहून मुंबई म्हणजेच १८० किलोमीटरपर्यंत रॅली काढत शनिवारी रात्री मुंबईत पोहोचले आहेत. आज शेतकरी आंदोलनानिमित्त आझाद मैदानात संयुक्त शेतकरी आंदोलनाची सभा पार पडल्यानंतर आता पायी मोर्चा घेऊन राजभवनाच्या दिशेने निघाले आहेत.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, इतर शेतकरी संघटनांचे नेते व मंत्री हे देखील आंदोलनात सहभागी झाले आहेत.

काँग्रेस नेते व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी देखील या सभेवेळी भाषण करताना केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘शेतकरी व मजूर जी मागणी करतात ती मंजूर होत नाही. मग हे कायदे का लादले जात आहेत. जो किसान की बात करेगा, वही देश पे राज करेगा’ असा इशारा देखील सुनील केदार यांनी यावेळी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!