टिम महाराष्ट्र देशा : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची यंदा प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानीची तीव्रता लक्षात घेता शेतमालाला चांगला दर मिळण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. छत्रपती संभाजी राजे साखर उद्योग कारखाना शेतकऱ्यांना अडीच हजार रुपयांचा दर देणार आसल्याची माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले.
चितेपिंपळगाव (ता. औरंगाबाद) येथील छत्रपती संभाजी राजे साखर उद्योग कारखान्यात एकोणवीस वा गळित हंगामास आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. बागडे म्हणाले छत्रपती संभाजी राजे साखर उद्योग कारखान्यांनी इथेनॉल प्रकल्पामधून मागील वर्षी एस डी एस खरेदी पंचवीस लाख 27 हजार लिटर इतकी केली , असून इथेनॉलचे उत्पादन 23 लाख 73 हजार लिटर एवढे घेतले.
इथेनॉल विक्री 23 लाख 44 हजार लिटर एवढी केली ,असून प्रति लिटर दर 43.4 मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळण्यासाठी आमचाच पूर्वीपासूनच प्रयत्न असून तो यापुढेही सरकार असो वा नसो तो कायम असेल.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1203988390493839360?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1203985528837693440?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1203980017060810757?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

