🕒 1 min read
मुंबई : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वन-डे मालिका, आयपीएल या स्पर्धांना करोनाचा फटका बसला आहे. देशात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 96 वरुन 101 वर पोहोचली आहे. भारतात कोरोनाबाधितांची संख्या 100 च्यावर पोहोचली आहे.
तसेच करोनामुळे देशभरात निर्माण झालेल्या परिस्थितीचा अंदाज घेता, बीसीसीआयने सर्व महत्वाच्या स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ‘गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, प्रवास टाळा, असं आवाहन राज्य शासनाकडून करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या चाहत्यांना…या परिस्थितीत खंबीर राहत योग्य ती काळजी घ्या असा संदेश दिला आहे. तसेच इंडिया टुडे वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार करोनामुळे स्पर्धा पुढे ढकलल्यानंतर, धोनी-रैना आणि इतर महत्वाच्या खेळाडूंनी सरावसत्रात न सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
Let's stay strong and fight the #COVID19 outbreak by taking all precautionary measures. Stay safe, be vigilant and most importantly remember, prevention is better than cure. Please take care everyone.
— Virat Kohli (@imVkohli) March 14, 2020
दरम्यान, कोरोना व्हायरसचा धोका पाहता आयपीएलचं आयोजन लांबणीवर पडलं असून, 15 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. तर भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्यांची मालिका रद्द करण्यात आली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

