Share

औरंगाबादेतील एसटी कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतिक्षा!

Published On: 

औरंगाबाद: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या आवाहनानंतरही औरंगाबाद विभागातील एसटी कर्मचारी रुजू झालेले नाही. एसटीच्या त्रिसदस्यीय समितीकडून २२ जानेवारीनंतर येणाऱ्या अहवालाकडे एसटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. समितीकडून आलेल्या अहवालानंतर उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीत जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली असून आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी कर्मचारी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची भेट घेणार आहेत.

एसटीचे राज्यशासनात विलीनीकरण या प्रमुख मागणीसह इतर अनेक मागण्यांसाठी कर्मचारी ७ नोव्हेंबरपासून संपावर गेले आहेत. आजपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात संपातून माघार घेऊन ९०० कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. मात्र इतर कर्मचारी अजूनही विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट झाले असून न्यायालयाच्या सुनावणी नंतरच पुढील दिशा स्पष्ट होणार असल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले.

जोपर्यंत विलीनीकरण होणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम असल्याचे औरंगाबाद येथील एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथील आगारात प्रातिनिधिक स्वरूपात मोजकेच कर्मचारी दुखवटा पाळण्यासाठी बसलेले आहेत. वाढती रुग्ण संख्या पाहता इतर कर्मचार्‍यांनी घरूनच सहभागी होण्याचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांतर्फे घेण्यात आला आहे. शुक्रवारी जिल्हाभरात एसटीच्या १५० बसेसच्या माध्यमातून ३५० फेऱ्या करण्यात आल्या. यातून ५३७९ प्रवाशांनी प्रवास केला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!