नवी दिल्ली : कोरोनानंतरही रिकाम्या स्टेडीयममध्ये क्रिकेटचे सामने खेळवण्याचा अनेक देशांचा मानस आहे. यावर भारताचा कर्णधार विराट कोहली याने आपले मत मांडले आहे. रिकाम्या स्टेडियममध्ये सामने खेळण्यात काहीच अडचण नसणार आहे. परंतु जे वातावरण प्रेक्षक असताना असते ते मात्र नसेल, असे विराट कोहली म्हणाला आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये टी -२० विश्वचषक आयोजित करण्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियमपासून दूर ठेवता येईल, कारण या क्षणी जागतिक आरोग्य संकटामुळे त्याच्या घटनेबाबत अनिश्चितता आहे. स्टार स्पोर्ट्स शो ‘क्रिकेट कनेक्ट’ मध्ये कोहली म्हणाला, ‘हे शक्य आहे, कदाचित होईलच. खरं सांगायचं तर प्रत्येकजण ते कसे घेणार हे मला माहिती नाही कारण आपणा सर्वांना इतक्या उत्कट चाहत्यांसमोर खेळण्याची सवय आहे.
Wondering what ???? would be like inside an empty stadium?
Catch #KingKohli's take on this possibility on #CricketConnected:
⌛: Every Saturday & Sunday, 7 PM & 9 PM
????: Star Sports & Disney + Hotstar pic.twitter.com/5thch2J6Bu— Star Sports (@StarSportsIndia) May 8, 2020
पुढे तो म्हणाला की, ‘मला माहित आहे की सामने महान भावनेने खेळले जातील, परंतु प्रेक्षकांच्या जयघोषाने खेळाडूंमध्ये उत्साह वाढतो, स्टेडियममधील प्रत्येकजण खेळामध्ये निर्माण होणारा तणाव अनुभवत असतो. त्यामुळे ही मजा कुठेतरी हरवलेली असेल.
दरम्यान टीम इंडिया लवकरच मैदानात उतरणार ? खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी तयार केली योजना
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) कोषाध्यक्ष अरुण धुमल यांनी गुरुवारी सांगितले की, राष्ट्रीय लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात जर निर्बंध कमी करण्यात आले तर अव्वल क्रिकेटपटू १ मे नंतर मैदानी प्रशिक्षण सुरू करू शकतात.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

