🕒 1 min read
मुंबई – नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारीत काही प्रमाणात तथ्य असल्याचा स्वीकार करून मुख्यमंत्र्यांनी यात करण्यात आलेल्या भरीव वाढीची माहिती दिली होती. राज्यात सुरुवातीला ३ हॉस्पीटलमध्ये विलगीकरणाची सुविधा होती आता २५७६ रुग्णालयात ती उपलब्ध आहे. अडीचलाख आयसोलेशनची सुविधा आणि २५००० बेडस ऑक्सीजनच्या सुविधेसह उपलब्ध आहेत. आयसीयू बेडसची संख्या २५० हून ८५०० इतकी वाढवली असल्याची माहिती दिली होती मात्र आता कोरोनामुळे मुंबईत कोरोनामुळे किती भीषण अवस्था आहे याकडे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी लक्ष वेधले आहे.
दरम्यान, चित्रा वाघ यांनी सरकारवर शरसंधान केले आहे. दिवसेंदिवस कोरोनारूग्ण वाढत चाललेत व त्यासोबतचं त्यांची परवड सुद्धा.कोविड रूग्णालयात बेड उपलब्धतेची माहिती एका क्लीकवर देण्यात यावी हि वांरवांर मागणी महाराष्ट्र भाजपकडून केली गेली. सरकारने सनदी अधिकारी नेमून अजूनही बेड व्यवस्थापन झालेले नसल्याचं वाघ यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
दिवसेंदिवस #कोरोनारूग्ण वाढत चाललेत व त्यासोबतचं त्यांची परवड सुद्धा.कोविड रूग्णालयात बेड उपलब्धतेची माहिती एका क्लीकवर देण्यात यावी हि वांरवांर मागणी @BJP4Maharashtra कडून केली गेली.सरकारने सनदी अधिकारी नेमून अजूनही बेड व्यवस्थापन झालेले नाही(१/२)@CMOMaharashtra @rajeshtope11
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 2, 2020
वाघ यांनी आपल्या ट्वीटमध्ये ठाकरेंना देखील टोला लगावला आहे. केवळ तळमळीनं भाषणं करून लोकांना मदत होतं नाही. यासाठी कोविडचे व्यवस्थापन होणे अत्यावश्यक आहे जे अजूनही झालेले नाही दिवसाला हजारच्यावर कोरोनाबाधित रूग्ण सापडताहेत तरी आज ही लोकांना बेडची उपलब्धता एका क्लीकवर उपलब्ध नाही ज्याने रूग्ण व त्यांच्या परीवाराचे अतोनात हाल चालू आहेत असं वाघ यांनी म्हटलं आहे.
वैफल्य ग्रस्त व्यक्तीची वैफल्यग्रस्त टीका;अनिल गोटेंवर भाजप नेत्याकडून पलटवार
आम आदमी पार्टीचे उद्या राज्यभरात ‘वीजबिल माफ करा’आंदोलन
#व्यक्तिविशेष ‘या’ एका व्यक्तीसाठी निलेश साबळेला व्हावे लागले डॉक्टर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
