🕒 1 min read
बीड : पूर्वी शेतकरी आणि सामान्य माणसाच्या विकासाचा कणा असलेल्या सहकार क्षेत्रात आता अनेक पाप होत आहेत. यामुळे अनेक सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. हे पाप कमी झाल्याशिवाय सहकार क्षेत्राचा उद्धार होणार नाही असे मत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. परळी तालुक्यातील टोकवाडी येथील शेतकरी कापूस प्रक्रिया सहकारी संस्थेच्या अद्ययावत जिनिंग व प्रेसिंग फॅक्टरीचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
पालकमंत्री मुंडे म्हणाले की, मराठवाड्यातील पाण्याचा दुष्काळ कायमस्वरूपी संपवायचा असेल तर पश्चिम वाहिनीचे अरबी समुद्रात जाणारे १६५ टीएमसी पाणी मराठवाड्यात वळवायला हवे. यामुळे शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटेल. याबाबत मी स्वतः राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला असल्याचाही उल्लेख त्यांनी केला. अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश सोळंके यांची, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय दौंड, माजी आमदार विजय गव्हाणे, बाबूराव मुंडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी आदींची उपस्थिती होती.
एकेकाळी शेतकरी व सामान्य माणसाच्या विकासाचा कणा असलेल्या सहकार क्षेत्रात होत असलेल्या पापामुळे अनेक सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. हे पाप कमी झाल्याशिवाय सहकार क्षेत्राचा उद्धार होणार नाही. सहकारी संस्थांना पुनरुज्जीवन मिळवून देण्यासाठी आघाडी सरकार कटिबद्ध असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठवाड्यात कोरोनाचा उद्रेक; जालन्यात संपूर्ण गाव सील; परभणीत आठवडी बाजार बंद
- जालनेकरांनो काळजी घ्या! जिल्ह्यात कोरोना वाढतोय; शनिवारी तिघांचा बळी; ७० नवे रुग्ण
- परभणीत ३१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; उपचारादरम्यान एकाचा मृत्यू
- दीक्षाभूमी एक्स्प्रेसने मार्ग बदलला; जालना-औरंगाबादेतील उत्तर भारतीय नागरिकांची गैरसोय
- पालम तालुका व ६५ गावे नळ पाणीपुरवठा योजनेला गती द्या : गुलाबराव पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
