जळगाव : शिवसेनेचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी क्रिकेट वादात मध्यस्थी केल्यामुळे त्यांच्यावर रविवार २५ जुलैरोजी रात्री गोळीबार करण्यात आला. या घटनेने जळगाव शहरात खळबळ उडाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून पोलीस यंत्रणेकडून तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, शहरातील खोटे नगर परिसराजवळ असलेल्या मैदानावर नितीन राजपूत आणि महेंद्र राजपूत या दोघांमध्ये क्रिकेट खेळण्यावरून वाद निर्माण झाला. हा वाद मिटविण्यासाठी उपमहापौर कुलभूषण यांनी या वादात मध्यस्थी केली. या वादात त्यांना शिवीगाळ करण्यात आली. या वादानंतर रात्री चारचौकी वाहनातून हल्लेखोरांनी त्यांच्या पिंप्राळा येथील घरावर गोळीबार केला.
या घटनेत मंगल सिंह राजपूत, महेंद्र राजपूत, बिऱ्हाडे, उमेश राजपूत यांचा समावेश असल्याचे कुलभूषण यांनी स्पष्ट केले आहे. या घटनेत ते सुदैवाने वाचले आहेत. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेविरुद्ध कुलभूषण यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मागील काही दिवसांपूर्वी वाळू व्यावसायिकांच्या वादातही कुलभूषण यांचे नाव आले होते. त्यामुळे त्यांच्यावर झालेला हल्ला या घटनेशी संबंधित असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या घटनेचा अधिक तपास केला जात असून या घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी! दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आग; राज्यपालांच्या खोलीचे मोठे नुकसान
- मोठी बातमी! झारखंड काँग्रेस आमदार खरेदी प्रकरणात भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंचे नाव
- उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर, साताऱ्यात; पूर परिस्थितीचा आढावा घेणार
- मुख्यमंत्री ठाकरे आज सातारा दौऱ्यावर, पूरग्रस्तांशी साधणार संवाद
- ‘पाच वर्षांची असतानाही तूच जबाबदारी सांभाळलीस…’, प्रीतम मुंडेंकडून पंकजांना खास शुभेच्छा


