पुणे : पुणे जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथे बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अन्यायाच्या विरोधात जे लढतात त्यांना नक्षलवादी म्हणता येणार नाही, असे वक्तव्य केले होते. त्यावर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे.
सदाभाऊ खोत ट्विट करत म्हणाले, भारताविरुद्ध युद्ध पुकारनाऱ्या नक्षलवाद्यांना पवार साहेबांच्या पाठींबा. परंतु जे एसटी कामगार संविधानाच्या आराखड्यात राहून आपल्या हक्काची लढाई लढत आहे त्यांना मात्र निलंबनाचे पत्र. हा आहे महाराष्ट्राचा नवीन कायदा. अशा शब्दात सदाभाऊंनी शरद पवारांसह महाविकास आघाडी सरकारवर निशाना साधला आहे.
भारताविरुद्ध युद्ध पुकारनाऱ्या नक्षलवाद्यांना पवार साहेबांच्या पाठींबा..
परंतु जे एसटी कामगार संविधानाच्या आराखड्यात राहून आपल्या हक्काची लढाई लढत आहे त्यांना मात्र निलंबनाचे पत्र..
.
हा आहे महाराष्ट्राचा नवीन कायदा..— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) November 15, 2021
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले होते, सामाजिक परिवर्तन, सामाजिक न्यायासाठी झटणाऱ्या आदिवासी बांधवांनी देशाच्या जंगल संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी पार पाडली आहे. अन्यायाच्या विरोधात जे लढतात, त्यांना नक्षलवादी म्हणता येणार नाही. तसेच कायदा हातात घेऊन काही लोक नक्षलवाद पसरविताना आदिवासी बांधवांना बदनाम करत, असेही ते म्हणाले.
आदिवासी समाजातील इतर घटकात अंतर ठेवण्याचे कुठलेही कारण नाही. अठरा पगड जातींना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केले. त्यामुळेच ते रयतेचे राज्य म्हटले जाते. राघोजी भांगरे, बिरसा मुंडा यांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी जे योगदान दिले, त्याचे स्मरण आणि जतन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत वर्तमान आणि पुढील पिढय़ांसाठी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वाची असल्याचेही यावेळी पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- अन्यायाविरोधात लढणाऱ्यांना नक्षलवादी म्हणता येणार नाही- शरद पवार
- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन
- …त्यांचे जाणे अत्यंत वेदनादायी- नितीन गडकरी
- प्रत्येक घराघरात शिवचरित्र पोहाचवण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले- उदयनराजे भोसले
- गोखलेंच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘शिवसेनेसोबत युती…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

