🕒 1 min read
मुंबई : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने पुन्हा दोन आठवड्यांसाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यानुसार देश 4 मे पासून 17 मे पर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. देशात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या 35 हजाराच्या पुढे गेली आहे. तर, आतापर्यंत अकराशेहून अधिक लोकांचा यात बळी गेला आहे. त्यामुळे देशातील परिस्थिती पाहता आणखी काही दिवस लॉकडाऊन करणे आवश्यक होते. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांशी चर्चा झाली. त्यानंतर देशात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, ग्रीन आणि ऑरेंज झोनमधल्या नागरिकांना लॉकडाऊनमध्ये काही सवलती मिळण्याची चिन्हं आहेत.
आता याच लॉकडाऊन वाढीवर कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सडकून टीका केली आहे. ‘केवळ लॉकडाऊन वाढवून चालणार नाही. टेस्टिंग वाढल्या पाहिजेत. केंद्र याकडे दुर्लक्ष करत आहे. किती काळ गरीबांना आपण थांबवू शकतो याला मर्यादा आहे. देशाची आर्थिक परिस्थितीही याकरिता विचारात घ्यावी लागेल. लॉकडाऊन चा सदुपयोग करण्याची सद्बुध्दी केंद्र सरकारला लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना’ ! अस सचिन सावंत म्हणाले आहेत.
केवळ लॉकडाऊन वाढवून चालणार नाही. टेस्टिंग वाढल्या पाहिजेत.
केंद्र याकडे दुर्लक्ष करत आहे.
किती काळ गरीबांना आपण थांबवू शकतो याला मर्यादा आहे. देशाची आर्थिक परिस्थितीही याकरिता विचारात घ्यावी लागेल.
लॉकडाऊन चा सदुपयोग करण्याची सद्बुध्दी केंद्र सरकारला लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना!— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 1, 2020
दरम्यान, कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने त्याची साखळी तोडण्यासाठी केंद्र सरकारने 25 मार्चला 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषला केली होती. हा एकवीस दिवसांचा लॉकडाऊन 14 एप्रिलला संपणार होता. मात्र, कोरोनाचा धोका कायम असल्याचे पाहून हा लॉकडाऊन पुन्हा 19 दिवसांसाठी वाढवण्यात आला. या लॉकडाऊनचा कालावधी 3 मे ला संपणार होता. मात्र, पुन्हा दोन आठवड्यांसाठी हा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. हा लॉकडाऊन 4 मे पासून 17 मे पर्यंत राहणार आहे.


