Share

“…ते उत्तर प्रदेशात होऊ शकते, जर आठवलेंनी मध्यस्ती केली तर”, ‘त्या’ वक्तव्यावर रुपाली पाटील ठोंबरेंची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Union Minister of State Ramdas Athavale) यांनी भाजपला एक ऑफर दिली आहे. यामुळे एका वेगळ्याच राजकीय चर्चांना उधान आले आहे. ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तेबाहेर काढण्यासाठी भाजपने मन मोठं करुन शिवसेनेला पाच वर्ष मुख्यमंत्रिपदाची ऑफर द्यावी’, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे. यावरच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रामदास आठवले यांनी दिलेला सल्ला शक्य होऊ शकतो. पण उत्तरप्रदेश ते शक्य होऊ शकते. जर रामदास आठवले यांनी मध्यस्ती केली तर ते उत्तर प्रदेशात शक्य होऊ शकते. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे लोकसेवा करेल. असा विश्वासही रुपाली पाटील ठोंबरे यांनी व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.

नाशिक येथे रामदास आठवले यांनी हे वक्तव्य केले.भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी पुन्हा एकदा युती करावी,असे ते म्हणाले आहेत. ‘निवडणूक प्रचारात देशात नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस असा भाजपचा प्रचार होता. पण तेव्हा सेनेने आक्षेप घेतला नाही. पण निकालानंतर आकडे आले तेव्हा आपल्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही हे लक्षात आल्यावर सेनेने मुख्यमंत्रिपदासाठी हट्ट धरला. तेव्हा सेनेचा अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा फार्म्युला भाजपने फेटाळला, असेही आठवले यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!