Share

राज्य चालवणं हे काय येड्या-गबाळ्याचं काम नाही – रावसाहेब दानवे

Published On: 

पैठण : कोरोना व्हायरस साथीच्या काळात सत्ताधाऱ्यांनी राज्याचे दौरे करून जनतेला दिलासा देणं महत्त्वाचं असतं. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘मी आणि माझं कुटुंब’ म्हणत घरात बसून आहेत. राज्य चालवणं हे काय येड्या-गबाळ्याचं काम नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे. पैठण शहरात आयोजित विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी दानवे बोलत होते.

“राज्यात सरकार कोण चालवतं, निर्णय कोण घेतं, ते कळतच नाही. संकटकाळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते राज्यभर दौरे करत आहेत. पण राज्याचे प्रमुख ‘मी आणि माझं कुटुंब’ म्हणत घरात बसून आहेत, हे राज्याचं दुर्दैव आहे,”असं दानवे म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घराबाहेर पडून राज्याचा दौरा करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.याच मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ठाकरे यांच्यावर शरसंधान केले आहे. घराबाहेर पडल्यावर एकट्या मुख्यमंत्र्यांनाच करोना होतो का असा सवाल दानवे यांनी विचारला आहे. “राजा घराच्या बाहेर आला पाहिजे, प्रजेत सामील झाला पाहिजे,” असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!