🕒 1 min read
नवी दिल्ली : कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेवर भाष्य करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे ऍक्ट ऑफ गॉड असे म्हटले होते यावर विरोधकांनि अर्थमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली होती आता पुन्हा यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे. चीनने आपली जमीन ताब्यात घेतल्यानंतर ती परत मिळविण्यासाठी सरकारने काय केले ?, असा सवाल राहुल गांधींनी केला आहे.
ट्विट करत राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे, "चीन आपल्या जमिनीवर ताबा मिळवला आहे. ती जमीन परत मिळवण्यासाठी सरकार काय योजना बनवत आहे ? का हा मुद्दा देखील अॅक्ट ऑफ गॉड असल्याचे म्हणत सोडून देणार आहे.
The Chinese have taken our land.
When exactly is GOI planning to get it back?
Or is that also going to be left to an 'Act of God'?
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 11, 2020
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी देशात वाढलेल्या बेजरोजगारी , जीडीपी आणि अयशस्वी लॉकडाऊनमुळे सरकारवर टीका करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
भविष्यात विखे कुटुंब पुन्हा कॉंग्रेसमध्ये दिसले, तर नवल वाटायला नको- हेमंत ओगले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
