तुळजापूर : जगभरात कोरोनामुळे दहशतीचे वातावरण आहे. राज्यात देखील कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी शासन सर्व स्तरावर प्रयत्न करत आहे. कोरोनावर मात करता येईल पण त्यासाठी संपूर्ण देशाने एकत्र येत आलेल्या परिस्थितीचा सामना करणे महत्त्वाचे आहे, त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी) सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यत जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. सरकारच्या या देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
कोरोना विषाणूला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभर आज (रविवार) पाळण्यात येत असलेल्या ‘जनता कर्फ्यू’ला तुळजापूरवासियांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तालुक्यात स्वयंस्फूर्त संचारबंदीमुळे सर्व रस्त्यांवर शुकशुकाट अनुभवायला मिळला . तिर्थक्षेञ तुळजापूर तर प्लेग साथ विद्यापीठ नामांतर आंदोलन नंतर प्रथमच करोना मुळे शहरातील रस्ते निर्मनुष्य दिसुन आले.
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व उद्योग, दुकाने बंद असल्यामुळे सकाळी कामाला जाणाऱ्या कामगारांची लगबग व गर्दी कोठेही दिसत नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही बंद ठेवण्यात आली आहे. रिक्षा व टॅक्सी देखील पाहायला मिळत नाहीये.
चौकाचौकांमध्ये पोलीस कर्मचारी पाहायला मिळत असून खासगी दुचाकी किंवा खासगी मोटारींची अत्यंत तुरळक वाहतूक पाहायला मिळत आहे. अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्रे तपासून सोडण्यात येत आहे. कोरोनाच्या संकटाची पुरेशी जाणीव झाली असल्यामुळे नागरिकांकडून जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळल्याचे दिसुन आले.


