🕒 1 min read
नवी दिल्ली : देशात काही लोकांना विशिष्ट घटनांमध्येच मानवाधिकाराचं उल्लंघन होत असल्याचे दिसते अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लखीमपूर घटनेचे नाव न घेता केली आहे. आतापर्यंत एकदाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लखीमपूर घटनेबद्दल भाष्य केले नाही. पहिल्यांदाच त्यांनी या घटनेचा दाखला देत विरोधकांवर निशाणा साधला आहे.
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना चिरडलेल्या घटनेमुळे देशभरात संताप व्यक्त होत आहे. विरोधकांना केंद्र सरकारला लक्ष करत मानवाधिकाराचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर मोदींनी भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशात हिंसक घटना घडल्या, की त्यावरुन मानवाधिकाराचा मुद्दा चर्चेत येतो आणि आरोप प्रत्यारोप केले जातात. अशा घटनांवर मानवाधिकार आयोग देखील भूमिका घेत असतो. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या २८ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.
#WATCH | …Some people see human rights violations in some incidents but not in other similar incidents. Human rights are violated when viewed via political spectacles. Selective behaviour harmful to democracy. They attempt to harm nation's image through selective behaviour.: PM pic.twitter.com/5RsaIkMExw
— ANI (@ANI) October 12, 2021
यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, मानवाधिकारांशी संबंधित एक अजून बाजू आहे. सध्याच्या काळात मानवाधिकाराची व्याख्या काही लोक आपापल्या पद्धतीने करु लागले आहेत. काही लोकांना हिंसाचाराच्या घटनेत मानवाधिकाराचे उल्लंघन दिसते. पण तशाच दुसऱ्या घटनेत याच लोकांना मानवाधिकाराचे उल्लंघन दिसत नाही. ही मानसिकता देखील मानवाधिकारासाठी धोकादायक आहे. असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
Nation is going ahead with 'Sabka Saath, Sabka Vikas, Sabka Vishwas, Sabka Prayas'. In a way, it also works on basic principle of ensuring human rights for all. If Govt starts a scheme&it benefits only a few, it'll raise the issue of rights: PM at 28th NHRC Foundation Day program pic.twitter.com/bIkdUJJ4jI
— ANI (@ANI) October 12, 2021
पुढे बोलताना मोदी म्हणाले, मानवाधिकाराचं उल्लंघन तेव्हा होतं जेव्हा त्याला राजकीय चष्म्यातून पाहिलं जातं. हे वर्तन लोकशाहीसाठी अपायकारक आहे. असेच सोयीनुसार वर्तन करणारे लोक मानवाधिकारांच्या उल्लंघनाच्या नावावर देशाच्या प्रतिमेला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांपासून सावध रहायला हवे. असे म्हणत पंतप्रधान मोदींनी टीकाकारांवर निशाणा साधला आहे. महात्मा गांधींनी देशाला अहिंसेच्या तत्वावर अधारलेल्या चळवळीतून स्वातंत्र्या मिळवून दिले, त्यामुळे जगभरातील लोक बापूंकडे मानवाधिकार आणि मानवी मूल्यांचे प्रतीक म्हणून पहातात, असेही मोदी यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- समीर वानखेडेंवर मुंबई पोलिसांची करडी नजर?; पुराव्यासह केला आरोप
- ‘जर धोनी भाई खेळत नसेल तर…’, सुरेश रैनाचा आयपीएल निवृत्ती योजनेबद्दल मोठा खुलासा
- आरसीबी फक्त 10 खेळाडूंसह खेळत होता; परभावानंतर सेहवाची संघावर टीका
- ‘अतिवृष्टीने शेतकरी बेजार झालाय, महाराष्ट्र सरकार मात्र हफ्तावसुली करण्यात मग्न…कुछ तो शर्म करो’
- ‘हा प्रश्न मला विचारू नका’ म्हणत चालू मुलाखतीतून माईक फेकून मलिक निघून गेले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
