मुंबई – कोरोना संसर्गामुळे गेलं दीड वर्ष बंद असलेल्या राज्यातल्या शाळा काल पुन्हा सुरू झाल्या. ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग तर शहरी भागात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरु झाले. खूप दिवसांनी शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं.
प्रदीर्घ कालावधीसाठी शाळा बंद असल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याची शैक्षणिक गरज, उपलब्ध शैक्षणिक साधनसुविधा, आणि कुवत या नुसार विद्यार्थ्याच्या गुणवत्ता वृद्धीसाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल दिली.
ऑनलाईन,ऑफलाईन पद्धतीनं शिक्षण सुरु राहण्यासाठी ‘माझे विद्यार्थी माझी जबाबदारी’ या अभियानाच्या माध्यमातून सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्याचा प्रारंभ करत असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं. यामध्ये अध्यापनाचं नियोजन, वेळापत्रक, उपस्थिती, साहित्य, पालक सहभाग, मूल्यमापन, अभ्यासेतर नियोजन, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, शैक्षणिक सुविधा, शारीरिक आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘शेतकऱ्यांना चिरडून टाकणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचे काम योगी सरकार करत आहे’
- ‘निवडणूक आचारसंहितेचे कारण न दाखवता मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा’
- ‘शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते, लाठ्या-काठ्या उचला, अन् जशास तसे उत्तर द्या’
- भाजपा हा पक्ष शिवसैनिकांसाठी मावशीसारखा आहे – सुभाष साबणे
- शासकीय सेवेतील पती-पत्नीवरील अन्याय दूर करा; यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

