मुंबई : राज्यात कोरोना असताना दारूची दुकानं सुरु केली आहेत यावर आपले मत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केले. ते फेसबुक लाईव्हवरून बोलत होते.
ते म्हणाले की, राज्याची अर्थव्यवस्था बिघडली आहे. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सरकारी कर्मचारी व अधिकारी तसेच आमदार खासदार यांचे वेतन महिना पाचशे रूपये करावे. तसेच कोट्यवधी रूपयांची कर्जे बुडवून परदेशात दडुन बसलेल्यांचे उद्योगधंदे बंद करावेत. तरच राज्याची व देशाची अर्थव्यवस्था सुधारेल,’ असं ते म्हणाले.
तर सरकारी कर्मचारी, अधिकारी, आमदार खासदार यांना महिना 500 रुपये वेतन द्या असंही ते म्हणाले आहेत. कोरोनामुळे अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचऱ्यांना आणि आमदार-खासदारांना 500 रुपये वेतन करावे. आणि कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून गेलेल्यांचे उद्योगधंदे बंद करावेत, त्याशिवाय आपली अर्थव्यवस्था जागेवर येणार नाही, असे रघुनाथदादा म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

