मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीच्या वसुलीचे गंभीर आरोप केले होते. अंबानी स्फोटक प्रकरण व मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी सचिन वाझे याचे नाव आल्यानंतर परमबीर सिंह यांची बदली करण्यात अली होती. यानंतर नाराज झालेल्या परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून हे गंभीर आरोप केले होते.
दरम्यान, या सर्व प्रकरणाची सध्या सीबीआय चौकशी सुरु असून अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. परंतु आता विरारचे व्यावसायिक मयुरेश राऊत यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर आरोप केला आहे. २०१७ मध्ये पोलिसांनी घरावर दरोडा टाकून दोन गाड्या चोरी केल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. यामुळे आता परमबीर सिंगही अडचणीत येण्याची शक्यता आहे.
परमबीर सिंह यांच्यासह माजी पोलीस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा, ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी राजकुमार कोथमिरे आणि इतर पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. माझ्याविरोधात कोणतीही तक्रार नसताना मला खंडणी विरोधी पथकात तीन दिवस डांबून ठेवले आणि मारहाण केली, असा व्यावसायिक मयुरेश राऊत यांचा आरोप आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांच्याविरोधात तक्रारीचे सत्र सुरुच असल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
- आयपीएल स्पर्धा स्थगीत झाल्यानंतर मायदेशी परतताना परदेशी खेळाडुंना करावा लागतोय संघर्ष
- बदली केल्यानेच परमबीर सिंग यांनी माझ्यावर आरोप केले-अनिल देशमुख
- औरंगाबाद पोलिसांचा निर्णय नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा!
- पैसे गोळा करण्यासाठी पोलिस हेल्मेटसक्ती करत आहे!, खा. इम्तियाज जलील यांचा कडाडून विरोध
- मोठी बातमी : मराठा आरक्षणाचं उद्या ठरणार ! सर्वोच्च न्यायालय निकाल देणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

