Share

भाजपचा पराभव दिसणाऱ्यांनी मोतीबिंदूचे ऑपरेशन करावे

Published On: 

नागपूर : पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्ष आणि विरोधकांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र, भाजपने मोठ्या प्रमाणात विजय मिळवला असून यातही ज्यांना पराभव दिसत आहे, त्यांनी मोतीबिंदूचे ऑपरेशन करुन घ्यावे, असा खोचक सल्ला भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांवर टीका केलीय. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘आज भाजपने आसाम जिंकले, भाजपने पोंडीचेरी जिंकले, भाजपने पंढरपूर आणि बेळगाँव जिंकले, भाजपने बंगालमध्ये ३ वरून ७५+ जागा आणल्या. यातही ज्यांना भाजपचा पराभव दिसत असेल त्यांनी आयुष्मान भारत योजनेतून मोतीबिंदूचे ऑपरेशन करून घ्यावे.’

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने ‘२००+’ चा नारा दिला होता. मात्र, या ठिकाणी त्यांना १०० चा आकडाही पार करता आला नाही. त्यामुळे विरोधक भाजपवर टीका करत आहेत. मात्र, गेल्या वेळी केवळ तीन जागा असलेल्या बंगाल विधानसभेमध्ये यंदा भाजपने ७० च्या वर जागा मिळवल्या असल्याने भाजप आपल्या विजयाचा दावा करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!