🕒 1 min read
मुंबई:- महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरुन आता राजकारण पेटायला सुरुवात झाली आहे. मराठी अस्मिता, मराठी शक्ती जोपर्यंत एकवटत नाही तोपर्यंत कर्नाटक सीमवादाचा प्रश्न सुटणार नाही, असं सांगतानाच कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केली आहे.
त्यानंतर आता कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव सोडा मुंबईही आमचाच भाग आहे, अशी मुक्ताफळं उधळली आहे. मुंबईवर आमचा हक्क आहे, अशी दर्पोक्ती कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे. इतकच नाही तर मुंबई प्रदेश केंद्रशासित करा अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचं वक्तव्यही सवदी यांनी केलंय. सवदी यांच्या या वक्तव्यामुळं सीमाभागात संतापाची लाट पसरली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवडी यांना फटकारले आहे. जी गावं वादग्रस्त आहेत ती केंद्रशासित करावीत असं आपले मुख्यमंत्री म्हणाले. त्याला उत्तर देताना कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी तेथील लोकांना खूश करण्यासाठी मुंबई केंद्र शासित करा, असं म्हणाले असतील, असं सांगत त्यांच्या विधानाला कवडीचा आधार नाही, असं अजितदादा म्हणाले. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.
महत्वाच्या बातम्या
- पक्षविरोधी भूमिकेचे आ. सावंत यांच्याकडून खंडण
- ‘शेतकरी नेत्यांनी दिलेलं वचन पाळलं नाही;आता आमच्याकडून कोणतीही दया दाखवली जाणार नाही’
- उद्या केंद्रीय राज्यमंत्री अंतिम पत्र घेऊन अण्णा हजारेंची भेट घेणार; गिरीश महाजनांची माहिती
- ‘नामांतर हे बाळासाहेबांच्या आत्म्याला तृप्त करण्यासाठी नाही तर शिवसेनेला स्वत:चा अजेंडा चालवण्यासाठीच’
- भारताविरुद्ध लाजिरवाण्या परभावानंतर; ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडला बाहेरचा रस्ता


