🕒 1 min read
सिंधुदुर्ग : विधानसभा-लोकसभा पोटनिवडणुकांसह ५ राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. देशाचं लक्ष्य असलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा एकहाती बहुमत मिळवलं असून भाजपला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासारखे नेते प्रचाराच्या रणधुमाळीत उतरवून देखील दोन अंकी जागांवरच समाधान मानावं लागलं आहे.
मात्र आता निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफळल्याचं दिसून येत आहे. कालपासून सुरु झालेल्या या हिंसाचारामध्ये ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या मिळत आहे. हा हिंसाचार तृणमूल कॉंग्रेसने घडवून आणली असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलेला आहे.
प. बंगाल मध्ये होणारी हिंसा.. ही एका राजकीय पक्षा विरोधात नाही..
तर हिंदूना एक संदेश देणाऱ्या घटना आहेत..
65% विभाजित समाजाला सहजपणे हरवू शकतो..
आज प.बंगाल.. उद्या हिंदुस्तान ??— Nitesh Rane (@NiteshNRane) May 4, 2021
याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट केलं आहे. ‘प. बंगाल मध्ये होणाऱ्या हिंसा या एका राजकीय पक्षा विरोधात नाही…तर हिंदूना एक संदेश देणाऱ्या घटना आहेत. ६५ टक्के विभाजित समाजाला सहजपणे हरवू शकतो.आज प.बंगाल… उद्या हिंदुस्तान ??’ असं नितेश राणे म्हणाले आहेत. दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी बंगालमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला असून कार्यकर्त्यांचे हौतात्म्य वाया जाऊ देणार नाही, असं म्हणत हिंसेचा निषेध केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- आयपीएल रद्द झाल्यानंतर बीसीसीआयच्या निर्णयाचे ‘या’ संघाकडुन स्वागत
- बंगालमध्ये राहुल गांधींनी प्रचारसभा घेतलेल्या सर्व काँग्रेस उमेदवारांचं डिपॉझिट झालं जप्त
- पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा धुमाकूळ; आता कोल्हापुरात उद्यापासून कडक लॉकडाऊन
- मोठी बातमी! कोरोनाच्या विळख्यामुळे आयपीएल स्पर्धा अनिश्चीत काळासाठी स्थगित
- ‘गोकुळ’ मध्ये पाटील गटाची घौडदौड, तर महाडिक गटाने खातं उघडलं !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

