मुंबई : करोनाग्रस्त रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. मुंबईतील परिस्थिती गंभीर असताना आमदार नितेश राणे यांनी एका रुग्णाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या हा रुग्ण नीट लक्ष दिलं जात नसल्याचं सांगत आहे.
याचाच धागा पकडत भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा ठाकरे सरकारवर शाब्दिक निशाणा साधला आहे. ‘महाराष्ट्रात माणसांच्या जिवाचं काहीही मूल्य राहिलेलं नाही,’ अशा तिखट शब्दात राणे यांनी सरकारवर टीका केली आहे.
Shatapbdi hospital!
No value of life left in Maharashtra anymore!
After almost 50 days of Listening to the Maha Gov if this is what we have to see everyday then why do we need this Gov anyways!!! pic.twitter.com/JZJ5YUdFIh— Nitesh Rane (@NiteshNRane) May 10, 2020
पुढे राणे म्हणतात, ‘शताब्दी हॉस्पिटल. महाराष्ट्रात जिवाचं काहीही मूल्य राहिलेलं नाही. ५० दिवस सरकारचं ऐकून घेतल्यानंतरही प्रत्येक दिवशी हे बघायला मिळत आहे. मग आपल्याला या सरकारची गरज काय? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, मुंबईत शनिवारी ७२२ नवीन रुग्ण वाढले असून २७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बळींची संख्या ४८९ पर्यंत पोहोचली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून दररोज ७०० च्या वर रुग्ण सापडत आहेत, तर संशयित रुग्णांची संख्याही वाढत आहे.


