Share

‘मुख्यमंत्र्याच्या आमदारकीसाठी वाकून भीक मागत होते, आता गरज संपल्यावर परत बीजेपी वर टीका चालू झाली’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशामुंबई : केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (IFSC) गुजरातला स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात मधील गांधीनगर येथे हे कार्यालय असणार आहे. एकाच ठिकाणाहून आंतरराष्ट्रीय कारभार करणे सोपे होईल यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. यावर राज्यातील कॉंग्रेस , राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांनी आक्षेप घेतला आहे.

आता भाजपचे नेते निलेश राणे यांनी यामुद्द्यावरून शिवसेनेवर टीका केली आहे. ते म्हणाले केंद्र सरकारने प्रस्तावित आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (आयएफएससी) प्राधिकरण मुंबईऐवजी गांधीनगर, गुजरात येथे स्थापन करण्यासंबंधी घेतलेल्या निर्णयाबाबत शिवसेनेला टीका करण्याचा अधिकार नाही कारण २०१७ मध्ये शिवसेना भाजप सोबत सत्तेत असताना हा निर्णय झाला आहे.

निलेश राणे यांचं ट्वीट –

‘शिवसेनेचं नेतृत्व कधीच सुधारणार नाही. मुख्यमंत्र्याच्या आमदारकीसाठी वाकून भीक मागत होते, आता गरज संपल्यावर परत बीजेपी वर टीका चालू झाली. महाराष्ट्राची अस्मिता वगैरे विषयावर बोलायचा अधिकार शिवसेनेकडे नाही. युतीच्या काळात झालेला निर्णय बीजेपी वर ढकलून शिवसेना हात झाडू शकत नाही.’

‘IFSC चा प्रस्ताव २०१५ ला तयार झाला आणि २०१७ डिसेंबरला अरुण जेटली ह्यांनी IFSC अहमदाबाद मध्ये होणार हे जाहीर केलं. तेव्हा युतीचं सरकार होतं आणि तेव्हा पासून सुभाष देसाई उद्योग मंत्री आहेत. शिवसेना आता विरोध का करतेय?? तेव्हा झोपले होते का???’

 

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!