🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : आता थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. तसेच हिवाळ्यामध्ये आहार असा असावा, याच प्रमाणे त्वचेची काळजी कशी घ्यावी, लहान मुलांच्या त्वचेची आणि आहाराची काळजी कशी घ्यावी असे अनेक प्रश्न गृहिणींना पडतात.
याच पार्श्वभूमीवर हिवाळ्यात मूळव्याधीची प्रवृत्ती वाढते. त्याला प्रतिबंध करण्यासाठी गाजर आहारात असलेले चांगले. गाजरात तंतुमय पदार्थ भरपूर असतात. गाजर अग्निदीपन करणारे म्हणजेच भूक वाढवणारे असून ते पोटात तयार होणारी आम्लताही कमी करते.
तसेच मसाल्याचे पदार्थ उत्तम असतात. हळद, आले, हिंग, लसूण, मोहरी, मिरची, कोथिंबीर, मेथ्या, पुदिना, ओवा, मिरी, लवंग, तमालपत्र, दालचिनी, जायफळ, तीळ वगैरे मासाल्याचे पदार्थ हिवाळ्यात वापरणे उत्तम असते.
दरम्यान, हिवाळ्यात सहजतेने मिळणारी बोरे ही बहुगुणी असतात. त्यात स्निग्धांश असतो. यातून पोटातील अग्नी प्रज्वलित होतो. बोरामुळे पित्त व कफ कमी होते, तसेच पोट साफ होण्यास ती उपयुक्त ठरतात. स्निग्ध गुणधर्माचा लसूण हिवाळ्यात आहारात असणे चांगले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1206111415871791104?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1206105983405056002?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
