Share

Gulabrao Patil | “…तर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत सत्ता स्थापन केली असती” ; गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट

Published On: 

Gulabrao Patil | जळगाव : शिंदे गटातील नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. उठाव केला नसता तर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) भाजपसोबत सत्ता स्थापन केली असती, असे वक्तव्य शिंदे गटातील नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वी देखील पहाटेच्या वेळी भाजपसोबत शपथ घेतली होती, असे पाटील म्हणाले.

सकाळी कोंबडा जेव्हा बांग देतो तेव्हा राष्ट्रवादीने भाजपसोबत शपथ घेतली होती. कदाचित एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जर उठाव केला नसता तर राष्ट्रवादी भाजपबरोबर जाताना दिसली असती, असे गुलाबराव पाटील म्हणाले. शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी दावा केला आहे की राष्ट्रवादीचे 10 ते 12 आमदार फुटले आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाचा फक्त मुहूर्त ठरायचा बाकी आहे, यावर गुलाबराव पाटील बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या ‘राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा’ या शिबिराचा पहिला दिवस संपन्न झाला. शिर्डी येथे हे शिबिर सुरु आहेत. या शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिंदे गटावर टीका करत आहेत. या शिबिरानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल असा दावा करण्यात येत आहे. यावरही गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“अधिवेशन संपले. पण सरकार कोसळण्याची आम्ही वाट पाहत आहोत. आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह कायम राहावा आमदारांमध्ये फूट पडू नये म्हणून राष्ट्रवादीकडून अशा प्रकारची विधाने केली जातात”, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!