मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी येत्या रविवारी म्हणजेच ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटे लाइट बंद ठेऊन, मेणबत्ती, फ्लॅशलाइट लावा असं आवाहन केलं आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे. याबाबत ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘मोदींच्या भाषणामुळे देशातील नागरिकांची निराशा झाली आहे.
पुढे ते म्हणाले की, ‘पंतप्रधान चूल पेटवण्याबद्दल बोलतील वाटलं होत. मात्र, त्यांनी दिवे पेटवण्याचे आवाहन केले आहे, असा टोला नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लगावला आहे.
दरम्यान, ‘5 एप्रिलला रविवारी रात्री 9 वाजता आपल्या घरातील सर्व लाईट्स बंद करून मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची टॉर्च लावा. यावेळी चारी दिशांना दिव्यांचा झगमगाट होईल,’ असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.


