🕒 1 min read
अकोला : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकार चालवताना होणाऱ्या समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी पवारांसमोर नाराजी व्यक्त केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
त्यानंतर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात वैयक्तिक बैठक झाली. या बैठकीनंतर राज्यात शिवसेना-भाजपा एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. मोदी-ठाकरे यांचे चांगले संबंध आहेत. आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र नसलो तरी आमचं नातं संपलं नाही असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं होतं.
या बैठकीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य करताना हे सरकार चालेल की नाही असं अनेक जण म्हणतात. परंतु महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष चालेल आणि आगामी २०२४ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र लढतील आणि जिंकतील असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे.
मात्र दुसरीकडे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पवारांच्या ‘ऐकी’च्या नाऱ्यालाच सुरुंग लावला आहे. शरद पवार काय म्हणालेत हे आपल्याला ठावूक नाही. मात्र, आपल्या काँग्रेस पक्षाची भूमिका आपणच जाहीर करणार असल्याचं पटोले यांनी निक्षून सांगितलं. पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस पक्ष राज्यात स्वबळावरच लढणार असल्याचं ते म्हणालेत. यासोबतच 2024 मध्ये काँग्रेस हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष राहणार असल्याचं भाकीत केलं आहे. ते अकोल्यात बोलत होते.
महत्वाच्या बातम्या
- जेष्ठ नागरिकांचे १००% लसीकरण पूर्ण करणाऱ्या ‘या’ तीन गावांचा आदर्श इतरांनीही घ्यायला हवा
- पहाटेच्या अंधारात झालेलं सरकार नाही! सर्वांसमोर झालेलं सरकार आहे – मंत्री नितीन राऊत
- ‘३ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, पण अंमलबजावणीत कुचराई करणाऱ्या बँकांना वठणीवर आणा’
- संभाजीराजे-उदयनराजे भेट लांबणीवर, उदयनराजे म्हणतात…
- राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर पवारांच्या भेटीला ; दोघांमध्ये तीन तास झाली चर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
