🕒 1 min read
अहमदनगर:- मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही.
आता याच मुद्यावरून राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना आमचा त्यास विरोध असल्याचं थोरात यांनी ठामपणे सांगितलं आहे.
दरम्यान, औरंगाबादप्रमाणेच अहमदनगरचेही नामांतर व्हावे. अहमदनगरचे नाव आंबिकानगर करावे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी काल शिर्डी येथे पत्रकारांशी बोलताना केली आहे.
औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर व्हावे, ही जनतेची इच्छा आहे. त्यासंबंधी आमचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील. मात्र, औरंगाबादपाठोपाठ अहमदनगरचेही नामांतर होऊन या शहराला अंबिकानगर नाव देण्यात यावे अशी आमची मागणी आहे, असे सांगत खासदार सदाशिव लोखंडे यांनी या जुन्या मागणीला हवा भरली आहे.
महत्वाच्या बातम्या
- …म्हणून आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी चक्क सायकलने गाठले मनपा कार्यालय
- हनुमा विहारी की मयांक अगरवाल तिसऱ्या कसोटी सामन्यातून कोणाला मिळणार डच्चू ?
- सर्वांनी एकत्रित येऊन लोककल्याणाची कामे करायची असतात : देवेंद्र फडणवीस
- आधार डेटा चोरीप्रकरणी ‘गुगल पे’ विरोधात याचिका दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
