नवी दिल्ली : कोरोनामधून अर्थव्यवस्था व जनतेला दिलासा देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पाच दिवसांच्या सततच्या पत्रकार परिषदानंतर आणखी 21 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. परंतु यापैकी केवळ दीड लाख कोटी रुपये सरकारच्या खिशातून खर्च होणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पीएम मोदी म्हणाले होते की जीडीपीच्या सुमारे 10% इतक्या सवलतीचे पॅकेज आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत दिले जाईल, परंतु एका अहवालानुसार संपूर्ण पॅकेजेसच्या सुमारे 1.5 लाख कोटी रुपये हे सरकारी तिजोरीतून जाणार आहेत. ते जीडीपीच्या केवळ 0.75% आहेत.
ब्रिटीश ब्रोकरेज फर्म बार्कलेजच्या संशोधन अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. उर्वरित पैसे खरोखर अनेक स्त्रोतांकडून येत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपली रोख वाढविण्यासाठी उपाय म्हणून सुमारे 8.1 लाख कोटी रुपयांच्या उपाययोजना जाहीर केल्या आहेत. या व्यतिरिक्त इतर पॅकेजेसचा काही हिस्सा सरकारची पत हमी, राखीव धान्य किंवा इतर आर्थिक-उपाययोजनांच्या स्वरूपात आहे.
बार्कलेजने आपल्या अहवालात म्हटले आहे की, ‘सरकारला एकूण 21 लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत आहे. यात रिझर्व्ह बँकेच्या सुमारे 8 लाख कोटी रुपयांच्या पाठिंब्याचा समावेश आहे. आमचा अंदाज आहे की त्याचा परिणाम सरकारच्या अर्थसंकल्पात केवळ 1.5 लाख कोटी रुपये होईल, जी जीडीपीच्या 0.75 टक्के आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 मे रोजी 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. त्यानंतर 13 ते 17 मे या पाच दिवसांत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक पॅकेजला अंतिम रूप दिले. ते म्हणाले की हे पॅकेज आर्थिक सुधारणांसाठी आहे आणि देशाची अर्थव्यवस्था हळूहळू वेग वाढवेल. सरकारने नव्या व जुन्या घोषणेसह एकूण 20,97,053 कोटी रुपये दिले आहेत.
कपिल सिब्बल यांनी 20 लाख कोटीच्या पॅकेजबाबत व्यक्त केली शंका
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक पॅॅकेजवर टीका केली आहे. मोदींनी दिलेले पॅकेज केवळ 4 लाख कोटींचे असल्याचे कपिल सिब्बल यांनी म्हंटल आहे. रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया 8 लाख कोटी रुपये अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी देणार आहे. तर 5 लाख कोटींचे सरकार अतिरिक्त कर्ज घेणार असून एक लाक कोटी रुपये रिवॉल्व्हींग गँरंटी( ठेवी) मधून मिळणार आहेत पंतप्रधान मोदी 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केल्याचे बोलत आहेत. मात्र, कॅश आऊट फ्लो फक्त 4 लाख कोटींचा असणार आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे, असे सिब्बल म्हणाले होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

