Share

आठवड्यातून दोनदा पाणी पुरवठ्यासाठी मनसे आक्रमक, मनपा आयुक्तांचेच नळ कनेक्शन कापले

Published On: 

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महानगरपालिकेचे आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांच्या बंगल्याचे नळ कनेक्शन ग्राइंडरने कट करण्यात आले. काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत मनसेच्या वतीने शहराला एक दिवस आड पाणी पुरवठा करण्याचे अल्टिमेटम देण्यात आले होते. नसता मनपा आयुक्तांच्या बंगल्याचे नळ कनेक्शन कट करण्याचा इशाराही देण्यात आला होता. त्यावर ‘अॅक्शन मोड ऑन’ करत मनसेने पहाटेच आयुक्तांच्या बंगल्याचे कनेक्शन तोडले.

पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शहरातील पाणी पुरवठ्याचा महत्त्वाचा प्रश्न हाताळत आठवड्यातून दोनदा शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्याच्या सूचना मनपा आयुक्तांना दिल्या होत्या. परंतु आयुक्तांनी त्यावर आठवड्यातून दोनदा पाणी देणे शक्य नसल्याचे भाष्य केले होते. यासाठी दिनांक ७ रोजी मनसेचे जिल्हा संघटक बिपिन नाईक यांनी पत्रकार परिषद घेत दहा दिवसात पाणीपुरवठ्याचे नियोजन करून शहरवासीयांना एक दिवस आड पाणी मिळावे यासाठी मनपा आयुक्तांनी प्रयत्न करावे नसता दहा दिवसानंतर मनपा आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानाचे नळ कनेक्शन तोडणार असल्याचा इशारा दिला होता.

दरम्यान दहा दिवस होताच रविवारी पहाटे मनसे कार्यकर्त्यांनी आयुक्तांचे शासकीय निवासस्थान गाठत नळ कनेक्शन वर ग्राइंडर फिरवत त्याला तोडून टाकले. त्यानंतर घोषणाबाजी करत ते तिथून निघून गेले. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!