🕒 1 min read
लखनऊ : उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. निवडणुकीसाठी बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावतीही सक्रिय झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांना पक्ष बांधणीचे निर्देश दिलेत. त्याशिवाय त्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही मास्टरप्लॅनही तयार केलेत.
त्याचाच एक भाग म्हणून बसपा ब्राह्मणांचे मंडलीय संमेल्लन आयोजित करणार आहे. याची जबाबदारी राष्ट्रीय महासचिव सतीश चंद्र मिश्रा यांना देण्यात आली आहे. याची सुरुवात २३ जुलैपासून अयोद्धेतून होणार आहे. मिशन २०२२ साठी ब्राह्मणांना सोबत जोडण्यासाठी मायावती रणनीती आखताना दिसत आहेत.
I'm very hopeful that Brahmins will not vote for BJP in next Assembly polls. A campaign in leadership of BSP Gen Secy SC Mishra will be launched from Ayodhya on July 23 to connect with Brahmin community&assure them that their interests are safe in BSP rule only:BSP chief Mayawati pic.twitter.com/4rEEW7RRq5
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) July 18, 2021
याबाबत मायावती यांनी सांगितले की, ‘मला पूर्ण विश्वास आहे की आगामी विधानसभा निवडणुकीत ब्राह्मण समाज भाजपाला मतदान करणार नाही. अयोध्येतून ब्राह्मण समाजाला जोडण्यासाठी व त्यांचे हीत बसपा सरकारमध्येच आहे हे त्यांना पटवून देण्यासाठी मोहीम सुरू केली जाणार आहे. त्याकरिता अयोध्येत ब्राह्मण संमलेन घेतले जाणार आहे.
बसपा स्वतंत्र लढणार
बहुजन समाज पक्ष प्रमुख मायावती यांनी १५ जानेवारी, २०२१ रोजी एक महत्त्वाची घोषणा केली होती. आगामी निवडणुकीत बसपा कुणाशीही आघाडी करणार नाही. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुका बसपा स्वत:च्या बळावर लढवणार असल्याचं मायावतींनी जाहीर केले. कोणत्याही पक्षाशी आघाडी केल्यानं त्याचं नुकसान बहुजन समाज पक्षालाच सहन करावं लागतं, असंही मायावतींनी म्हटलंय. उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकांत बहुजन समाज पक्षाचा विजय निश्चित असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान करा!’ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे धक्कादायक वक्तव्य
- ‘पटोलेंच्या बोलण्याने महाविकास आघाडीवर काहीही परिणाम होणार नाही’, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
- आठवले दोन दिवसांत पलटले! शिवसेनेला म्हटले भाजपसोबत या, अन् आज केले राष्ट्रवादीला आवाहन
- ‘..तर मग भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र का येऊ शकत नाहीत?’, आठवलेंचा नवाब मलिकांना प्रतिप्रश्न
- ‘पवारांनी आता एनडीएसोबत येण्याची वेळ आलीये!’, आठवलेंनी दिले राज्यात सत्ता स्थापनेचे निमंत्रण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
