Share

बारावी पर्यंतचे शिक्षण सक्तीचे करा; छात्रभारतीच्या आदोलकांना शिक्षणमंत्र्यांच्या घराबाहेरून अटक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : छात्रभारती विद्यार्थी संघटनेने दि.२७ जुलै रोजी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर चर्चा करून मागण्यांचे निवेदन सादर केले होते. सदर निवेदनात मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असे नमुद केलेले असतांना देखील शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील महत्वाच्या शिक्षण विषयक मागण्यांकडे कानाडोळा केला.

मोडुन पडलेल्या शिक्षण व्यवस्थेला संजीवनी मिळेल अशी अपेक्षा वर्षा गायकवाड यांच्याकडून होती मात्र त्यांनी देखील शिक्षणाच्या प्रश्नांवर कुठलीही भरीव तरतूद केली नाही अथवा सामान्यांना कुठलाही दिलासा दिलेला नाही हे पुरोगामी सेक्युलर विचारधारेच्या काँग्रेस पक्षाच्या महाविकासआघाडीतील शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी लक्षात घ्यायला हवे आणि तातडीने छात्रभारतीच्या मागण्या मान्य करून राज्यातील गरीब सामान्यांच्या मुलाबाळांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी काम करावे, अशी मागणी छात्रभारती करून करण्यात आली आहे.

कोरोनाच्या कठीन काळात विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून रहावा यासाठी विद्यार्थी हिताच्या खालील मागण्यांचा सकारात्मक निर्णय व्हावा , ही विनंती. सकारात्मक निर्णय न झाल्यास छात्रभारती विद्यार्थी संघटना तीव्र आंदोलन करेल. असे निवेदन छात्रभारतीने शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांना सादर केले होते.

  • मुलींच्या मोफत शिक्षणाच्या दि. ६ मार्च १९८६ च्या परिपत्रकाची सर्व अनुदानित विनाअनुदानित व खाजगी संस्थामध्ये कठोर अंमलबजावणी करावी.
  • कोवीडमुळे नोकरी किंवा रोजगार गेल्याने शाळा / कॉलेजची फी भरली नाही अशा पालकांच्या मुलांची फी शासनाने तात्काळ भरावी.
  • १० वी व १२ वी च्या परीक्षेची फी भरायला पैसे नाहीत म्हणून फॉर्म न भरल्यामुळे नापास ठरवल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना पास करावे.
  • १२ वी पर्यंतचे सर्व शिक्षण सक्तीचे व मोफत करावे. विनाअनुदानित धोरण रद्द करावे, विनाअनुदानित धोरणाच्या नावखाली विद्यार्थी व पालकांची लूट थांबवावी.
  • राज्य भरात IT विषयाची फी शासनाने ठरवून द्यावी व ती राज्यभर एकच असावी.
  • राज्यातील अनुदानित विनाअनुदानित तसेच खाजगी शिक्षण संस्थांमधील अतिरिक्त बेकायदेशीर फी घेतली जाते राज्य शासनाने एक फी धारणा निश्चित करुन एकाच स्तरावरअंमलबजावणी करावी.
  • कोरोना काळात विद्यार्थ्यांकडून घेतलेले परीक्षा शुल्क तात्काळ परत करावे.
  • १२ वी पर्यंत विद्यार्थ्यांना मोफत बस पास द्यावे.
  • कोरोना काळात लाखो विद्यार्थ्यांनचे शिक्षण बंद झाले आहे , त्या विद्यार्थ्यांना तातडीने शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ठोस पाऊले उचलावी.

आंदोलनात छात्रभारतीचे कार्याध्यक्ष रोहित ढाले, संघटक सचिन बनसोडे, अनिकेत घुले, राज्य सदस्य गणेश जोंधळे, मुंबईच्या अध्यक्षा दिपाली आंब्रे, मुंबईचे कार्याध्यक्ष सचिन काकड, नवी मुंबईचे अध्यक्ष अजय कांबळे, रायगडचे अध्यक्ष जिंतेद्र किर्दकुडे, पदाधिकारी कार्यकर्त्यांना अटक झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!