मुंबई : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी शिवछत्रपतींचा वसा आणि वारसा सांभाळत सुराज्य आणि सुशासन आणले. त्यांचा राज्यकारभार आजच्या आव्हानात्मक परिस्थितीत मार्गदर्शक असा आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीदिनी अभिवादन केले आहे. तसेच सामाजिक न्याय दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राजर्षी शाहूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या सुखासाठी कल्याणकारी स्वराज्याची पायाभरणी केली. शिवछत्रपतींचा हा वसा आणि वारसा राजर्षी शाहूंनी समर्थपणे पुढे नेत सुराज्य आणि सुशासन आणले. समाज परिवर्तनाच्या पुरोगामी चळवळींना बळ देतानाच शिक्षण, आरोग्य, औद्योगिक, सहकार, कृषी, सिंचन अशा क्षेत्रांनाही त्यांनी पाठबळ दिले. महिला सबलीकरणासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. मोठ्या अशा वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचे त्यांचे आरक्षणाचे धोरण आज जगाच्या अभ्यासाचा विषय ठरला आहे. राजर्षी शाहूंनी राज्यकारभार सदैव लोकाभिमुख असाच केला. समता, बंधुता आणि सार्वभौमत्व या लोकशाही मूल्यांबाबत ते आग्रही होते. आजच्या आव्हानात्मक परिस्थितीत लोकराजा शाहूंचा राज्यकारभार मार्गदर्शक असा आहे. त्यानुसार वाटचाल करणे,हेच त्यांना जयंतीदिनी अभिवादन ठरेल. राजर्षी शाहूंना त्रिवार अभिवादन आणि त्यांना मानाचा मुजरा.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी समन्वयाने काम करावे लागणार – अजित पवार
दरम्यान, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्वसामान्यांना सामाजिक न्याय मिळावा, न्यायासनासमोर प्रत्येक व्यक्ती समान ठरावी, यासाठी क्रांतिकारक, पुरोगामी निर्णय घेतले. आपल्या संस्थानात सक्तीचे मोफत शिक्षण, आरक्षण, सामाजिक सुधारणा करून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे विचार सदैव मार्गदर्शक असून त्याच विचारांवर राज्याची वाटचाल सुरु आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंतीनिमित्त राजर्षी शाहू महाराजांना आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सामाजिक न्याय दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राजर्षी शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेच्या कल्याणाचा वारसा समर्थपणे पुढे नेला. उपेक्षित, वंचित घटकांना मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी पुरोगामी, क्रांतिकारक विचार दिला. बहुजन समाजातील मुलांसाठी वसतिगृहे सुरु केली. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी धरणे बांधली. बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण, स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे राजर्षी शाहू महाराज हे देशातील थोर समाजसुधारक होते. महात्मा ज्योतिबा फुले यांचा सत्यशोधक विचार त्यांनीच खऱ्या अर्थानं पुढे नेला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी मदत केली, त्यांना प्रोत्साहन दिले. अंधश्रद्धा निर्मुलन, अस्पृश्यता निवारणाचं काम केलं. अनिष्ट प्रथा, वाईट रुढी, चुकीच्या परंपरांवर बंदी घातली. आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देत, आपल्या राज्यात त्यासंबंधीचा कायदा केला. सामाजिक न्यायाचे, आरक्षणाचे जनक असलेले राजर्षी शाहू महाराज यांच्या पुरोगामी, प्रगत, दूरदृष्टीपूर्ण विचारांमुळे नेहमीच आपल्यासाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी आहेत, असे सांगत उपमुख्यमंत्र्यांनी राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन केले आहे.
सलून, केशकर्तनालये आणि ब्युटी पार्लर्स सुरु करताना ‘या’ अटींचे पालन करावे लागणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
