🕒 1 min read
मुंबई : देशाच्या आर्थिक राजधानीत कोरोनाने चांगलेचं थैमान घातले आहे. मुंबईत सध्या संख्या साडे आठ हजारांहून अधिक नागरिक कोरोनाबाधित आहेत. विशेष म्हणजे धरावी आणि गोवंडी झोपडपट्टीमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यावरून भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपेंना पत्र लिहिलं आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाही सोमय्यांनी लक्ष्य केले आहे.
या पत्रात त्यांनी कोरोनाबाधितांच्या संख्येत होणाऱ्या वाढी बाबत चिंता व्यक्त केली आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर ४ टक्के असताना शिवाजीनगरमधील कोरोनाबाधितांचा मृत्यूदर १३.४ टक्के इतका आहे. मुंबईत कोरोनाचे ८ हजार १७२ रुग्ण सापडले. त्यापैकी ३२२ जणांचा मृत्यू झाला. तर शिवाजीनगरमध्ये ३५२ पैकी ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाजीनगरमधील परिस्थिती गंभीर होत आहे का?, असा सवाल सोमय्यांनी ट्विटरवरुन विचारला आहे.
Corona Death Rate Shivajinagar 13.4% Mumbai 4%. ShivajiNagar Govandi at Fire!!?? Out of 352 Positive 47 Died. Mumbai 8172 Positive 322 Died. COVID19 Death Rate of Mumbai 4% ShivajiNagar Govandi 13.4%. @BJP4India @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @mybmc @MumbaiPolice pic.twitter.com/hUcChbKwiz
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 3, 2020
पालिकेच्या एम पूर्व विभागातील शिवाजीनगरमधील परिस्थिती अतिशय भीषण आहे. या परिसरातील अनेक भागांमध्ये गर्दी होत आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात नाही. १ ते २ मे या कालावधीत शिवाजीनगरमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे. आसपासच्या रुग्णालयांमध्ये पुरेसे बेड नाहीत. ५० ते ६० वर्षे वय असलेल्यांना उपचार मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचं प्रमाण जास्त आहे, असं सोमय्यांनी म्हटलं आहे. ठाकरे सरकार सध्या विधान परिषद निवडणुकीत व्यस्त असल्यानं त्यांना याकडे पाहायला वेळ नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.
Soon Worli will reach '1000 Corona Positive' Highest in India. Thackeray Sarkar says it's "Worli Pattern"
(presently Worli have 800+ Corona Positive)
लवकरच वरळी '१,००० कॉरोना बाधित' चा आकडा गाठणार, भारतात हा "उच्चांक". ठाकरे सरकार ह्याला" वरळी पॅटर्न" म्हणतात@BJP4Maharashtra
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 4, 2020
तर किरीट सोमय्या यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील कोरोनाच्या स्थितीवरुनही ठाकरे सरकारला लक्ष्य केलं. वरळीतल्या कोरोना रुग्णांची संख्या सध्या आठशेपेक्षा जास्त आहे. लवकरच वरळीतील कोरोनाबाधितांची संख्या १ हजारवर पोहोचेल. भारतात हा उच्चांक असेल. ठाकरे सरकार यालाच वरळी पॅटर्न म्हणायचं का ? असा टोला लगावला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
