🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : वीज, स्वस्त धान्य, आरोग्य सेवा, पाणी, चांगले शिक्षण या योजना आणि सुविधा ग्रामीण भागातील सामान्यांना मिळाल्या पाहिजेत. प्रशासनाने यात हलगर्जीपणा केलेला खपवून घेणार नाही, असे निर्देश आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रशासनाला दिले.
क्षीरसागर यांनी मंगळवारी उमरद जहागीर येथे जनता दरबार घेतला. गावात स्वस्त धान्य मिळत नाही, शाळेला शिक्षक नाहीत, रोहित्र जळाल्याने गाव महिन्यापासून अंधारात आहे.
तलाठी गावात येत नाहीत अशा ढीगभर समस्यांचा आणि तक्रारींचा पाढाच ग्रामस्थांनी यावेळी वाचला. क्षीरसागर म्हणाले, जनतेची कामे करण्यासाठी सतर्क राहावे, मुख्यालयी न येणाऱ्या तलाठी-ग्रामसेवकांवर कारवाई करावी, ठराविक लोकांचीच कामे करण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.
‘पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या योजना सामान्यांना मिळाल्या पाहिजेत’. असेही ते म्हणाले. तहसीलदार सचिन खाडे, कृषी विभागाचे दिलीप जाधव, ग्रामीण पोलिस ठाण्याचे सुजित बडे, महावितरणचे कार्यकारी अभियंता भारंबे, सानप, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गंगाधर घुमरे, बबन गवते उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1206144375123664898?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1206141139641757697?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
