Share

‘कुत्रे सोडल्यासारख्या तपास यंत्रणा अंगावर सोडल्या जात आहेत’, काँग्रेसचा मोदी सरकारवर निशाणा

Published On: 

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. नुकतीच त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. तर भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे यांच्या कुटुंबीयांचीही ईडीकडून चौकशी करण्यात येते आहे. खडसे यांचे जावई सध्या कोठडीत आहे. तर शिवसेनेचे नेते तथा अनिल परब यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार कायम आहे.

या प्रकरणांमुळे केंद्रातील सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार होत आहे. परंतू सर्व काही नियमांप्रमाणे होत असल्याचा दावा भाजप नेते करत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘कुत्रे सोडल्यासारख्या तपास यंत्रणा अंगावर सोडल्या जात आहेत’ अशी टीका चव्हाण यांनी केली.

पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, ‘कुत्रे सोडल्यासारख्या तपास यंत्रणा अंगावर सोडल्या जात आहेत. दोषी ठरल्यावर कारवाई करा. आधीच्या काळात असे होत नव्हते. खडसे यांनी पक्ष बदलल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. पण दुसऱ्या कुण्या नेत्याला प्रवेश दिला की भाजपात धुतल्या तांदळासारखे होते, आणि नंतर काय झालं? असा सवालही चव्हाण यांनी विचारला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!