नवी दिल्ली : पाकिस्तानी स्टॉक एक्स्चेंजच्या कराचीमधील इमारतीवर सोमवारी दहशतवादी हल्ला झाला. यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी संसदेत भाषण करताना भारतावर निराधार आरोप केले आहेत. या हल्ल्यामागे भारत असल्याचा कांगावा पाकिस्तानने केला आहे.
‘इंदुरीकर महाराजांना टार्गेट केलं जातं आहे, आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत’
इम्रान यांनी हल्ल्यामागे भारतच असल्याबाबत कुठली शंका नाही, असे त्यांनी म्हटले. 2008 च्या मुंबई हल्ल्याचा संदर्भ देताना पाकिस्तानी पंतप्रधान म्हणाले, ‘जे मुंबईत घडले, ते त्यांना पुन्हा कराचीमध्ये करायचे होते. त्यांना अनिश्चितता पसरवायची होती असं खान यांनी म्हटलं आहे.
…हीच विठ्ठल चरणी प्रार्थना; नरेंद्र मोदींनी मराठीतून दिल्या आषाढीच्या शुभेच्छा
दरम्यान, कराची हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) या संघटनेने स्वीकारली आहे. ती संघटना पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात सक्रिय आहे. बीएलएला पाकिस्तानपासून बलुचिस्तान वेगळे हवे आहे.


