Share

राज्यात यंदा समाधानकारक पाऊस, हवामान विभागाकडून मान्सूनचे पहिले अंदाज पत्रक जाहीर

Published On: 

मुंबई : राज्य कोरोनाच्या संकटात असताना आता एक आनंदाची बातमी आली आहे. यंदा मान्सून चांगला होणार आहे. जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊस चांगला होणार असल्यानं शेतकऱ्यांना यावेळी पेरणी वेळेत करता येणार आहे. 5 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत 96 ते 100 टक्के पाऊस पडेल असं हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.या वृत्तामुळे राज्यातील शेतकरी हा नक्कीच सुखावणार आहे.

मान्सून बाबतचा पहिला अहवाल आज हवामान खात्याने जाहीर केला. या अहवालानुसार यंदा हा मान्सून वेळेत म्हणजे 1 जूनपर्यंत दाखल होईल. त्यानंतर चेन्नईकडून 4 जून पंजाब 7 जून, हैदराबाद 8 जून, पुणे 10 आणि मुंबई 11 जून असा प्रवास करत दिल्लीपर्यंत 27 जूनला पोहोचेल.

तसेच 2020 या वर्षात मान्सूनचा पाऊस हा दीर्घकालीन सरासरीच्या 100 टक्के असेल, तर मॉडेलच्या त्रुटीमुळे 5 किंवा -5% असा त्रुटी येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. मागच्या वर्षी मान्सून उशिरा आला होता आणि पाऊस कमी पडल्यानं शेतकऱ्यांची पेरणीही लांबली होती. मोठं नुकसान झालं होतं यंदा मात्र मान्सून वेळेत येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!