Share

25 वर्षीय एरोनॉटिकल इंजिनियर बनली गावची सरपंच

Published On: 

माजलगाव : 25 वर्षीय ऋतुजा राजेंद्र आनंदगावकर या एरोनॉटिकल इंजिनियर तरुणीने मंजरथ या गावच्या सरपंचपदाची निवडणूक जिंकली आहे. दोन पुरुष उमेदवारांचा पराभव करून तिने ही मजल मारली आहे . ऋतुजा उच्च शिक्षित असून तिने ऐरोनॉटिकल सायन्स मध्ये एम.टेकची पदवी प्राप्त केली आहे.

मंजरथ या गावाचे सरपंच पद सर्वसाधारण वर्गासाठी राखीव होते. यामुळे या निवडणुकीत चुरस होती. असे असताना देखील निवडणूक लढवून ऋतुजाने या निवडणुकीत उमेदवारी दाखल केली. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत तिने विजय अक्षरशः खेचून आणला.

एरोनॉटिकल इंजिनियर आहे ऋतुजा

ऋतुजा उच्च शिक्षित आहे. तिने इंडियन इन्स्टिट्युट ऑफ ऐरोनॉटिकल सायन्समध्ये शिक्षण पूर्ण केले असून ती इंजिनीअर आहे. तिने ‘एम टेक’चे शिक्षणही पूर्ण केले आहे. अवघ्या पंचवीसाव्या वर्षी सरपंच झालेल्या ऋतुजाचे स्वप्न गावचा विकास करण्याचे आहे. तिच्या विजयाने गावात आनंदाचे वातावरण आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!